Saturday, June 19, 2021

☝बदलता भारतिय समाज 🖋

 टिप: प्रस्तुत लेख माझा नाही परंतु मला अतिशय छान वाटला आणि काही गोष्टी आवडल्या म्हणून मी ते ब्लॉग वर टाकत आहे. 

स्त्रोत - अज्ञात 

*अमेरिकेत  देव नाही*

*ना मठ नाही*

*पण पाऊस मात्र वेळेवर* 

*आहे व भरपूर आहे..!!*


*गेल्या 200 वर्षात* 

*दुष्काळ  नाही*

*कुठले होमहवन नाही* 

*कसले अभिषेक नाही* 

*ना अनुष्ठानं नाही* 

*ना,पारायणे नाहीत*


*अमेरिकेत लोकसंख्या* 

*नियंत्रणात आहे.*

*अन्नधान्य विपूल आहे.*

*सुखसोयी विपूल आहेत* 

*कशाचीच कमतरता नाही.*


*माणशी 2876 वृक्ष आहेत.*

*भारतात फक्त माणशी*

*28 झाडे आहेत*


*आपल्याकडे वृक्षवल्ली* 

*आम्हां सोयरे म्हणतो...*

 *पण एकही भारतीय झाड* 

*लावत नाही,जपत नाही.* 


*अमेरिकेत घरासमोर* 

*हिरवळ नाही असं घर नाही*

*भारतात दारात झाड नाही.* 

*तर हिरवळ कुठली..*


*स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष  झाली*

*साधं पिण्याच पाणी देवू* *शकत नाही*

  

*अमेरिकेचे क्षेत्रफळ*

*भारता पेक्षा तिप्पट आहे*

*आणि लोकसंख्या आहे*

*31 कोटी.* 

*भारताची आहे 135 कोटी*

*35 कोटीची 135 कोटी* 

*झाली फक्त 80 वर्षात.*

*एवढीच जबरदस्त  प्रगती आहे.* 

*इथै हजारो जाती...,*

*सतराशे साठ धर्म...,* 

*कुणाचाच मेळ नाही...,* 

*प्रत्येकजण  म्हणतो* 

*आमचाच देव खरा*

*आमचाच धर्म  मोठा....*

*नाही लेकरांना तोटा...*.

*एक मुलगा सांभाळ करने* 

*कठीण झाले..... तरी* 

*एकएकाला सतरा लेकरं.* 

*कुत्र्यावाणी भटकत आहेत* 

*रस्त्यावर*

 *ना शिक्षण  ना संस्कार*

*ना आचार ....ना शिस्त* 

*सगळं बिनधास्त आणी मस्त.* 

   

*आताच पिण्यास पाणी नाही.*

*तर पुढे काय.. कुणालाही* 

*पर्यावरणाची फिकर नाही.*

*निसर्गाची चाड नाही..*

*नुसतेच भरतात कुंभमेळे* 

*आणि जत्रा व यात्रा,*

*जमात व धर्माचे मेळे होत आहेत*

*प्रार्थना  केल्या जात आहे*

*नुसतेच माजलेत धर्माचे स्तोम*

 

 *एकाही धर्माच्या देवात* 

*पाऊस पाडण्याची ताकद नाही.* 

 *उससे बडा कोई नही"*


*ईश्वराशिवाय कुणी महान नाही.* 

*हे ऐकुण ऐकुण  58 वर्ष  झाली.*

*दरवर्षी  तेच पाऊस नाही* 

*पडलाच तर पिकाला भाव नाही.*

*शेतकरी पाऊस पडला*

*तरी आत्महत्या करतो*

*नाही पडला तरी आत्महत्या* 

*करतो*


*सगळंयाना आरक्षण पाहीजे* 

*म्हणता म्हणता..आरक्षण* 

*100%होण्याची वेळ  आली*

*तरीही  काही मिळनार नाही*


*वित्तमंत्री सितारामन यांनी*  

*संसदेत सांगीतले*

*देशातील 1 लाख 60 हजार* 

*कंपन्या बंद झाल्या ....*

*सहाकोटी लोक बेरोजगार* *झाले.*

 

*नोक-याच नाही तर* 

*आरक्षण घेवून काय* 

*चाटायचे......??* 

*आता नोक-याच बंद होत* 

*आहेत*

*आहे त्या नोकरांनाच* 

*पगार देण्याची व देशाचा* 

*विकास करण्याची ताकद* 

*सरकारमध्ये नाही*

*सगळा पैसा आमदार* 

*खासदार यांच्या सेवा* 

*सवलती व पेन्शन मध्येच* 

*संपत आहे*

      


*सबका विकास* 

*जावून भारत बनेगा भकास*

*असं दिसत आहे.....* 


*निवडणुकावरचा विश्वास*  

*उडाला आहे.*

*मॅचच फिक्स असेल तर* 

*खेळायचेच कशाला*

*जनता दिशाहीन झाली आहे* 

*स्वप्न राखेत मिसळली आहेत.* 

*संविधान नावांला उरले आहे*


 *चौकशी शिवाय अटक* 

*असा न्याय झाला आहे.* 

*प्रचंड महागाई ने जनता* 

*मरणप्राय झाली आहे.* 

*तरी सरकार डिझेल* 

*पेट्रोलचे दर  वाढवतच आहे.*

*दवाखाना कुटूंबाचे दिवाळं* 

*काढत आहे.*

*जनतेला लुटण्यासाठी* 

*लुबाडण्यासाठी सरकार* 

*सहीत असंख्य  गिधाडे* 

*सरसावली आहेत.....!*

 

*चिंता व ताणतणावाने*

*अर्धा भारता मधुमेह ग्रस्त* 

*झाला आहे....* 

*30% लोकांना रक्तदाब आहे.*

 

*शेतात काम करायला*

*मजूर नाही*

*अंगमेहनतीला माणुस नाही*


*सगळे  बिनकामाची माणसं* 

*आहेत.*

*नवरा साहेब  व बायको* 

*मॅडम झाल्या आहेत....!!*

😡😡😡😡😡😡🌹

 *स्वयंपाकाला....बाई* 

*भांडी व धुण्याला बाई.* 

*तरी मॅडमची सतत पाठ*

 *व कंबर दुखते आहे.*


*आणी.....,*

*साहेबांना टेकल्याशिवाय* 

*बसता येत नाही..*

*कुंभ मेळ्यात ..10,000* 

*सुशिक्षित व उच्चशिक्षित* 

*लोकांनी  साधूची दिक्षा* 

*घेतली......,*

*आणी आता  रस्त्यावर*  

*भटकत आहेत....* 

*विरक्त झाले आहेत....* 

*लग्नाचे वय टळून गेले आहे.*

*बायका मिळत नाहीत.* 

*गांवागावांत किमान* 

*चाळीस पन्नास पोरं बिन* 

*लग्नाची आहेत....!*  

*भयंकर विदारक परिस्थिती*  

*आहे*


 *बाजारात फळे बळेच* 

*पिकवून विकत आहेत.* 

*मराठी शाळा बंद पडल्या* 

*आहेत* 

*मुलांना धड इंग्रजी येत नाही* 

*आणी मराठी येत नाही.*

*मराठी इंग्लिश मिक्स*

*बोलत आहेत....!*

*टिव्ही  वरच्या मालिका*

*नग्न झाल्या आहेत.....* 

*गुन्हेगारी जास्त दाखवत आहे.* 

*मुलं लहानपणापासूनच*  

*हिसंक होत आहेत.*

  

*13 व्या वर्षीच मुलंमुली* 

*पळून जात आहेत.* 

*दारू कितीही महाग केली*

*तरी त्यासाठी रांगा लागत* 

*आहेत*

*प्रार्थना स्थळे लुटीची* 

*ठिकाणं झाली आहेत.* 

*वृद्धाआश्रमाची संख्या* 

*झपाट्याने वाढत आहेत.*

*तो एक मोठा व्यवसाय होवू* 

*पहात आहे...!*


*आईला बाळासाठी* 

*वेळ  नाही*

*पाळणाघरे वाढत आहेत.*

*लेका-सुनांना सासुसासरे* 

*नकोत.*

*अनाथालये वाढत आहेत.* 

*भारतिय संस्कृती चा पार* 

*बट्याबोळ झाला आहे.*

*माणसं पदोपदी खोटं* 

*बोलत आहेत.*

*खोटं बोलणच खरं मानलं* 

*जात आहे....!*

*चोरांना लबाडांना प्रतिष्ठा* 

*मिळत आहे.....!* 

*सज्जनांना वेड्यात काढत* 

*आहेत..!* 

*लोकशाही समता बंधुता* 

*स्वातंत्र्य...,हे....फक्त* 

*वाट्सअपचे संदेशा पुरतीच* 

*मर्यादित  झाली आहे....!*

 

*चांगले वागण्याचे करोडो* 

*मेसेज रोज फिरत आहेत.* 

*प्रत्येक जण चांगलं वागा* 

*म्हणत आहे....!*

*आज ही सुना राॅकेल टाकुन* 

*जाळल्या जात आहेत....!*

  

*साहित्यीक मारले जात* 

*आहेत......!*

*शिवरायांनी 350 वर्षापुर्वी.*  

*साहित्यकांना उत्तम* 

*लिखाणासाठी कोटी रूपया* 

*पर्यंत मानधन दिले होते..!* 

*आज साहित्यीक भीक* *मागत आहेत.....!*

    

*एकंदरीत भारत* 

*विस्फोटाचा. व उद्रेकाचा*  

*ज्वालामुखी बनत आहे.* 

*भारत मानवी वस्ती  साठी* 

*धोकादायक होत चालला आहे.*

*वेळीच सावरलो नाही,तर* 

*आपल्या वारसांचे जीवन* 

*प्रचंड संकटाच्या गराड्यात* 

*सापडणार आहे.*

*हे नक्की...!!!🙏🙏🙏*

                                     


*मनापासून वाचा व*

*आवडला तरच रिप्लाय करा* 🙏🙏

गावरान पोळा...



 🖋माझा आईच्या आठवणीतील बैल-पोळा : *पिठोळा "

 आई स्वयंपाक करत असताना सहज तिला आठवण आली तिच्या माहेरातल्या लहानपणीच्या पोळयाची . आणि ती मला तिकडची गोष्ट सांगु लागली .तिकडची म्हणजे मराठवाडा (आईचे माहेर ) आणि खान्देश (सासर) .माझी आई म्हणजे दोन्ही संस्कृतींच अजब मिश्रण. 

  माझी आई सगळ्यात मोठी .सगळे मिळून ( मामा, मावशी आई , आणि बाबा -माळी) आधि पोळ्याच्या पहिल्या दिवशी रात्री शेणाने सारवलेल्या भिंतीवर चुन्याने बैल आणि शेतकर्‍याचे चित्र काढायचे आणि झोपून जायचे. मग सकाळी माळी भल्या पहाटेच उठुन वडे तळायची आणि स्वयंपाकाला सुरूवात करायची. मग माझी आई आणि सगळे मिळून बाकीच्या (म्हणजे पिठोळा काढायच्या ) कामाला सुरूवात करायचे. मग 'मरी-आईला बोनं द्यायला जात. तिकडे जाताना सगळं पुजेचं सामान आणि नैवेद्याचं ताट वाजत घेऊन जायचे. 

  तिथुन आल्यानंतर पिठोळ्याला सुरूवात व्हायची.मामाला भिंतीकडे तोंड करून बसायला लावायचे .मग आई, मावशी आणि माळी हातात मक्कीचे कणीस आणि वाईक घेऊन असे गाणे गायचे..... 

  पिठोळा -पिठोळा, 

  भावाचा पाठोळा. 

  पोळ्याच्या मातीच्या बैलांची पूजा. त्यांना मस्त गेरु लाऊन , दोरा गुंडाळायचा आणि त्यांसमोर सात प्रकारचे धान्य टाकून चंदनाचा टिळा लावायचा. 

 आणि मगच सगळेजण मिळुन एकत्र जेवण करायचे आणि तेव्हापर्यंत सगळे उपाशी रहायचे. 

  संध्याकाळी गावातल्या सगळ्या बैलांची शर्यत रहायची. जो शेतकरी त्यात जिंकला त्याला मानाचा 'नारळ' मिळायचा. पळुन बैल आणि शेतकरी थकलेले रहायचे. त्यामुळे गावात सगळया घरांसमोर बाज-खाट टाकुन त्यावर शाल आंथरून धान टाकायचे आणी बाजुला बादलीत पानी ठेवायचे. बैल घरासमोर आले की त्यांना पुरण-पोळ्या आणी धान्य खाऊ घालायचे. आणि मालकाला गुळ व पाणी द्यायचे...... 

  अशा प्रकारे त🖋माझा आईच्या आठवणीतील बैल-पोळा : *पिठोळा "

 आई स्वयंपाक करत असताना सहज तिला आठवण आली तिच्या माहेरातल्या लहानपणीच्या पोळयाची . आणि ती मला तिकडची गोष्ट सांगु लागली .तिकडची म्हणजे मराठवाडा (आईचे माहेर ) आणि खान्देश (सासर) .माझी आई म्हणजे दोन्ही संस्कृतींच अजब मिश्रण. 

  माझी आई सगळ्यात मोठी .सगळे मिळून ( मामा, मावशी आई , आणि बाबा -माळी) आधि पोळ्याच्या पहिल्या दिवशी रात्री शेणाने सारवलेल्या भिंतीवर चुन्याने बैल आणि शेतकर्‍याचे चित्र काढायचे आणि झोपून जायचे. मग सकाळी माळी भल्या पहाटेच उठुन वडे तळायची आणि स्वयंपाकाला सुरूवात करायची. मग माझी आई आणि सगळे मिळून बाकीच्या (म्हणजे पिठोळा काढायच्या ) कामाला सुरूवात करायचे. मग 'मरी-आईला बोनं द्यायला जात. तिकडे जाताना सगळं पुजेचं सामान आणि नैवेद्याचं ताट वाजत घेऊन जायचे. 

  तिथुन आल्यानंतर पिठोळ्याला सुरूवात व्हायची.मामाला भिंतीकडे तोंड करून बसायला लावायचे .मग आई, मावशी आणि माळी हातात मक्कीचे कणीस आणि वाईक घेऊन असे गाणे गायचे..... 

  पिठोळा -पिठोळा, 

  भावाचा पाठोळा. 

  पोळ्याच्या मातीच्या बैलांची पूजा. त्यांना मस्त गेरु लाऊन , दोरा गुंडाळायचा आणि त्यांसमोर सात प्रकारचे धान्य टाकून चंदनाचा टिळा लावायचा. 

 आणि मगच सगळेजण मिळुन एकत्र जेवण करायचे आणि तेव्हापर्यंत सगळे उपाशी रहायचे. 

  संध्याकाळी गावातल्या सगळ्या बैलांची शर्यत रहायची. जो शेतकरी त्यात जिंकला त्याला मानाचा 'नारळ' मिळायचा. पळुन बैल आणि शेतकरी थकलेले रहायचे. त्यामुळे गावात सगळया घरांसमोर बाज-खाट टाकुन त्यावर शाल आंथरून धान टाकायचे आणी बाजुला बादलीत पानी ठेवायचे. बैल घरासमोर आले की त्यांना पुरण-पोळ्या आणी धान्य खाऊ घालायचे. आणि मालकाला गुळ व पाणी द्यायचे...... 

  अशा प्रकारे ते पोळा साजरा करत असत!!!. 

लेखक -़़विशाल गोसावी  🖋